Saturday, December 26, 2009

हरवलेली पाने शोधतांना

दुसरे पान -  हरवलेली पाने शोधतांना

सर्वप्रथम धन्यवाद ! पहिल्या पानाला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल !

बरेच replies आलेत. अगदी "तू पण लिहितोस वाटतं !" पासून "तू कशाला लिहितोस बाबा ? " पर्यंत !

यातला गमतीचा भाग सोडला तर प्रश्न मात्र अगदी बरोबर आहे. म्हणजे मी काही अगदीच वाईट लिहित नाही , पण मग आतापर्यंत कधीच का काही लिहिलं नाही?

प्रश्न बांका आहे खरा , पण उत्तर सुद्धा तेवढाच सोपं आहे. बर जरा कोड्यातच सांगायचं झाला तर तुम्हीच सांगा . लो. टिळकांना गीता-रहस्य लिहायला मंडाले चा तुरुंगच का सापडला ? किंवा सावरकरांना "ने मजसी ने .." सारखं अजरामर काव्य करायला

Tuesday, December 22, 2009

सागरास ...

१९०९ मध्ये लंडन मध्ये असताना सावरकरांचा ब्रिटिशांनी छळ करायला सुरुवात केली. त्यांना कुठेही राहायला जागा मिळत नव्हती. म्हणून सावरकरांनी लंडन पासून ५० मैलावर समुद्रकिनारी असलेल्या ब्रायटन मध्ये जायचं ठरवलं. तेव्हा बिपिनचंद्र पालांचे पुत्र निरंजन पाल त्यांना वारंवार भेटत असत. अशाच एका भेटीत समुद्रकिनारी चर्चा करत असतांना सावरकर अचानक काही तरी गुणगुणायला लागले. त्या ओळी होत्या "ने मजसी ने परत मातृभूमीला , सागरा प्राण तळमळला !"




दुसरं पान लिहितांना जी या गाण्याच्या जन्मास्थानाबद्दल चूक झाली होती ती चूक दुरुस्त केली आहे. चुकीबद्दल क्षमस्व !




संदर्भ: हरवलेली पाने शोधतांना

सुजित, चूक दाखवून दिल्याबद्दल तुझा खुप आभारी आहे.


तुमचा शंतनू

Saturday, December 19, 2009

आमचं वॉर्म वेदर !

मेपल ची पाने
पान पाहिले - आमचं वॉर्म वेदर !

तुम्ही कधी दिवसातून दोनदा ७० किलो सामानाच packing केला आहे ? वेल नसेल केलं तर सांगतो तुम्हाला.
मी रोज दिवसातून दोनदा Packing करतो - माझा स्वतःच .
हो आता याला packing नाही म्हणणार तर अजून काय न ?
अजून विश्वास बसत नाही ? बरं सांगतो समजावून .

"आज जरा वॉर्म आहे !" असं येथले लोक म्हणतात.
म्हणजे अगदी आमची आजी म्हणते न त्या टोन मध्ये - " अरे .... तुला सांगते